चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील जंगल परिसरात मानव वन्यजीव संघर्ष हा काही नवा नाही, मात्र आता वन्यप्राणी शहराच्या मार्गाने कूच करीत असल्याचे दिसून येत आहे.
Chandrapur forest
चंद्रपुरातील जंगल परिसरात शनिवारी सायंकाळी मानवी पाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. Breaking news
याबाबत अधिक माहिती मिळाली असती अष्टभुजा प्रभागात राहणारे भजन बाराई हे जंगल परिसरात लाकूड तोडायला गेले होते, मात्र ते वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या क्षेत्रात गेले असता त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने भजन बाराई यांच्यावर हल्ला केला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. Tiger attack
भजन बाराई हे जंगलात लाकूड तोडायला गेले होते मात्र ते परत आले नाही, त्यांच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केला असे अशी शक्यता नाकारता येत नाही. जंगल परिसरात पायाचा अवयव आढळून आले असून उर्वरित अवयव कुठे आहे? याबाबत वनविभाग जंगल परिसरात शोध घेत आहे.
बाराई यांच्या मृत्यूबाबत ही संशय व्यक्त करण्यात येत आहे.
बाराई यांच्यावर वाघ किंवा बिबट्याने हल्ला केला असल्याची शक्यता नाकारता येत नाही, जिल्ह्यात आज वादळी वारा व पाऊस असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली असून बाराई यांचा उद्या शोध घेणार असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे.
चंद्रपूर शहरालगत असलेल्या हडसती रेती घाटावर सध्या रेती तस्करांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या संपूर्ण प्रकाराकडे बल्लारपूर महसूल प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप...
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगरच्या वतीने नियोजन भवन येथे पर्यावरण आणि वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे आमदार किशोर जोरगेवार...
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूरात सुरू करण्यात आलेल्या “अम्मा की पढ़ाई” उपक्रमाने आणखी एक उंची गाठली असून सदर शिक्षण केंद्रातील १३ विद्यार्थ्यांची...
चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रशासकीय इतिहासात नवा अध्याय जोडला गेला असून २०१७ बॅचच्या आयएएस अधिकारी वसुमना पंत यांनी जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला...